Durga Devi Puja
Durga Devi Puja, commonly known as Durga Puja, is one of the most significant Hindu festivals, primarily celebrated in India, Bangladesh, and Nepal. It honors Goddess Durga, symbolizing the victory of good over evil. The festival typically lasts ten days, with the last five days being the most significant.


Significance of Durga Puja
Durga Puja is a grand Hindu festival celebrating Goddess Durga’s victory over the demon Mahishasura, symbolizing the triumph of good over evil. It is a time of devotion, cultural festivities, and community bonding, especially in West Bengal and other parts of India. The festival honors feminine power (Shakti) and features elaborate rituals, artistic decorations, and vibrant processions. It also boosts local artisans and the economy. Concluding with Vijaya Dashami, where idols are immersed in water, the festival signifies renewal, victory, and the goddess’s return to her celestial abode.s.
Contact us for booking on +919421136968
श्री दुर्गादेवीचे मंदिर व देवीचा खांब
गुहागर, जि. रत्नागिरी
संकलन - सुधीर लिमये पेण
आमच्या गुहागरला निसर्गाने भरभरून दिलेलं आहे. गुहागरचे तसे तीन भाग आहेत – वरचा पाट, मधला किंवा देव पाट आणि खालचा पाट. खालच्या पाटात प्रसिद्ध व्याडेश्वर मंदिर आहे. व्याडेश्वर हे अनेकांचे कुलदैवत असल्याने इथे कायम गर्दी असते. वरच्या पाटात श्री दुर्गादेवीचं मंदिर आहे. तिथेही भाविकांची सतत वर्दळ असते. दुर्गादेवी जिथे अवतीर्ण झाली त्या जागेवर एक खांब बांधलेला आहे. खांबावर देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत. या खांबाच्या ठिकाणी देवीचा मूळ वास आहे. याला देवीचे मूळ स्थान असे न म्हणता देवीचा खांब असेच म्हटले जाते.
पूर्वीच्या काळी गुहागर आणि आसपासच्या समुद्रकिनाऱ्यावरच्या गावांना समुद्री चाचांचा खूप उपद्रव होत असे. हा उपद्रव नाहीसा करण्यासाठी गावकरी महिषासुरमर्दिनीला शरण गेले. तिने या चाच्यांशी युद्ध करून त्यांना पळवून लावले आणि गावाची सुटका केली. युद्ध करून झाल्यानंतर गुहागरच्या दातारांना देवीने दृष्टांत दिला की ती एका विशिष्ट ठिकाणी आहे आणि तिच्या अस्तित्वाची खूण तिथे ठेवली आहे. दातारांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना रुईच्या झाडाच्या एका पानावर देवीच्या नाकातल्या नथीचा मोती चिकटलेला सापडला. हा मोती आकाराने बोटाच्या एका पेराएवढा आहे. आजही तो देवळात जपून ठेवला आहे. नवरात्रात तो भाविकांना दर्शन घेण्यासाठी बाहेर काढला जातो.
हे मंदिर १३व्या शतकातील आहे. पूर्वी गुहागर आणि देशावर खूप आक्रमणे होत असत. त्यामुळे देवीचे मंदिर तिच्या मूळ ठिकाणापासून आत बांधायचे ठरले. दृष्टांतात देवीने मंदिर घरासारखे दिसावे असे सांगितल्याने मंदिराची रचना बाहेरून घर वाटेल अशी पण आतून घुमट आणि गाभारा युक्त करण्यात आली. मंदिरात चार मोठे मोठे खांब आहेत. मंदिराचा अलीकडेच जीर्णोद्धार केला असला तरी हे खांब तसेच ठेवण्यात आले आहेत.
देवी एकटी नसून ते पंचायतन आहे. देवीच्या चारही बाजूनी सूर्य, लक्ष्मीनारायण, शंकर आणि गणपतीची छोटी छोटी मंदिरे आहेत. काही शे वर्षांपूर्वीचा अश्वत्थ वृक्ष (पिंपळ वृक्ष) आजही तिथे बघायला मिळतो. या वृक्षाखाली सूर्यनारायणाचे मंदिर आहे. देवीच्या समोरच डाव्या बाजूला एक मोठं तळं आहे. तळ्याला बाराही महिने पाणी असतं. गुहागरातील सगळीजणं या तळ्यातच पोहायला शिकली आहेत.
देवीची रोज दोन वेळा षोडशोपचारे पूजा केली जाते. दुर्गादेवी सकाळी चि. सौ. कां. असते आणि संध्याकाळी ती कुमारिका असते. सकाळी तिच्या गळ्यात मुहूर्तमणी आणि एक वाटी असलेलं मंगळसूत्र असतं. आणि संध्याकाळी ते काढलं जातं. याविषयी एक आख्यायिका सांगितली जाते. देवी संपूर्ण तयार होऊन तिच्या लग्नाला निघाली असता काही कारणामुळे तिला लग्न घरी पोचायला उशीर झाला आणि मुहूर्ताची वेळ टळून गेली. त्यामुळे ती माघारी परतली. जाताना सवाष्णीच्या वेषात गेलेली ती पुन्हा माघारी आल्यावर कुमारिकेच्या मूळ रूपात परत येते. आजही देवीला सकाळी मणिमंगळसूत्र आणि साडी नेसवून तयार केले जाते. संध्याकाळची पूजा झाल्यावर तिला परकर पोलके नेसवले जाते.
नवरात्रीत देवीला रूपकं लागतात. रुपकं म्हणजे देवीवर संपूर्णपणे चांदीचा मुखवटा आणि आयुधं चढवली जातात. देवीच्या मूळ मूर्तीला कापडाने झाकून त्यावरच मुखवटा आणि तिची सगळी आयुधं लावली जातात. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा रोज नवीन साडी नेसवली जाते. डोळ्यात साठवून ठेवावे असे तिचे रूप दिसते. नवरात्रात नऊ दिवस रोज संध्याकाळी कीर्तन केले जाते. देवळातील कीर्तनकाराची गादी ही संत तुकारामांची गादी आहे. कीर्तन ऐकायला देवी येते अशी श्रद्धा आहे. त्यामुळे कीर्तनकाराच्या समोरच देवीची बसण्याची सोय केली जाते. देवीला बसण्यासाठी जो गालिचा आहे तो १६८७ सालातला आहे. या गालिच्यावर त्या काळी सोन्याच्या तारांनी जो मोर विणलेला आहे तो आजही जसाच्या तसा आहे. साडेतीनशे वर्षांपूर्वीची ती कलाकुसर आजही उत्तम स्थितीत आहे. या गालिच्यावर कीर्तन ऐकण्यासाठी देवी विराजमान होते. तिच्याकरिता गालिच्याच्या शेजारी चांदीचा नारळ आणि पानसुपारीचे चांदीचे तबक ठेवले जाते.
देवीला दोन बहिणी सुद्धा आहेत. पहिली, बुधल गावाची देवी जी काळ्या पाषाणात आहे, दुसरी दापोली मुरुड येथील देवी जी संगमरवरी दगडात कोरलेली आहे, आणि तिसरी गुहागराची दुर्गादेवी जी गंडकी दगडात कोरलेली आहे. नवरात्रात देवीचा गोंधळ घातला जातो. या गोंधळाला येण्याचे आवाहन देवीच्या दोन्ही बहिणींना केले जाते. मातीच्या सुगडात नारळाच्या कवट्या, सालं, गायीच्या शेण्या घालून त्यात तुपात भिजवलेल्या वाती घालून पेटवले जाते. त्यात ओल्या नारळाच्या चकत्याही टाकल्या जातात. नंतर या चकत्या प्रसाद म्हणून वाटतात.
आजही वरच्या पाटात पत्ता सांगायचा झाला तर देवीचा खांब हे परिमाण आहे. देवीच्या खांबाच्या बरोबर समोरून पुळणीकडे (समुद्राकडे) जाणारा रस्ता आहे. त्याला पायंडी म्हणतात. हा रस्ता भाविकांसाठी आहे. गुहागरकर आपापल्या नारळा-पोफळीच्या वाड्यातून समुद्रावर जातात.
दुर्गादेवीबद्दल मी थोडंसं लिहायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही सर्वांनी आवर्जून एकदातरी देवळाला भेट द्या. देवळात जाताना खांबाचे दर्शन जरूर घ्या.
Stay
Comfortable rooms are available for your business needs.
Rentals
© 2025. All rights reserved.